आमदार ऐन संकटात नागरिकांना वार्‍यावर सोडून निघून गेल्याने गोरगरीब हवालदिल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- कोणीही उपाशी राहणार नाही, अशी गर्जना करणार्‍या आमदार लहू कानडे यांचा दावा खोटा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदारांचे श्रीरामपूर संपर्क कार्यालय व निवासस्थान बंद असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांनी केला आहे.

भिसे म्हणाले की, करोनाच्या संकटाने गोरगरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत आमदार लहू कानडे यांनी दानशूर संस्था, संघटना, लोकांच्या माध्यमातून किराणा किटचे सामान गोळा करत गुजराथी मंगल कार्यालय येथून गरिबांना वाटप करण्याचे जाहीर केले.

हे वाटप करताना ग्रामीण भागाचा विचार केला गेला नाही. शहरातील हजारो गरिब कुटुंबांना मदत मिळाली नाही. ज्यांना मदतीची अपेक्षा आहे असे अनेक गरीब लोक आमदारांच्या घरी, कार्यालयासह गुजराथी मंगल कार्यालयात पायपीट करत जात आहेत.

मात्र दोन्ही ठिकाणी कुलूप असल्याने गरिबांची निराशा होत असल्याची खंत असल्याचे भिसे यांनी व्यक्त केली आहे. आमदार लहू कानडे हे ऐन संकटात श्रीरामपूर मतदार संघातील नागरिकांना वार्‍यावर सोडून निघून गेल्याने गोरगरीब हवालदिल झाले आहेत.

आ. कानडे यांच्यासाठी निवडणुकीत जीवाचे रान करणार्‍या कार्यकर्त्यांनी जनतेसाठी त्यांच्या विरोधात भूमिका घेण्याची वेळ आल्याचेही श्री. भिसे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment