‘हरहुन्नरी’ अभिनेता गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि २९ : एक कलाकार म्हणून प्रत्येक सिनेमात अभिनयाचा दर्जा वाढविणाऱ्या इरफान खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने ‘हरहुन्नरी’ अभिनेता गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

अमित देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, इरफान खान यांच्या डोळ्यातील चमक, सहज अभिनय, पडद्यावरचा सुंदर वावर यामुळेच त्यांनी प्रत्येक सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली.

टि.व्ही पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या इरफान यांनी दरवेळी वेगवेगळे सिनेमे निवडले. जागतिक सिनेमातही  इरफान यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन आणि प्रबोधन एकाचवेळी केले.

त्यांच्या दर्जेदार अभिनयाकरिता भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले होते. इरफान यांनी दोन वर्षे कर्करोगाशी झुंज दिली, परंतू ही झुंज अयशस्वी ठरली. इरफान यांच्या निधनाने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Leave a Comment