इरफान खानच्या अंत्यसंस्कारास येणार ‘इतक्या’ व्यक्ती, मृत्यूबाबत मोदी म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी दीर्घ आजारानंतर बुधवारी या जगाला निरोप दिला. इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोकांतिका पसरली आहे.

सोशल मीडियावर बरेच लोक इरफान यांना श्रद्धांजली वाहात आहेत. लॉकडाऊनमुळे नियमांचे काटेकोर पालन करत मुंबईच्या वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

कोट्यावधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या स्टारच्या अंत्ययात्रेत केवळ  20 लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. इरफानचा चाहता वर्ग खूप मोठा असल्याने सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवली गेली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींनादेखील हजर राहण्याची परवानगी नाकारली आहे. इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर झालेला होता. त्याला आतड्यांसंबंधी संसर्ग देखील झाला. इंग्लिश मीडियम हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

सोशल मीडियावर इरफानच्या मृत्यूबद्दल अनेक स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे. शूजीत सरकार  यांनी ट्विट करुन लिहिले आहे ”  प्रिय मित्र इरफान. तू शेवटपर्यंत लढलास, शेवटपर्यंत लढलास, शेवटपर्यंत लढलास.  मला तुझा अभिमान वाटतो. पुन्हा भेटू. “

पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केले दुःख  
 इरफानच्या मृत्यूवर  राजकारण्यांनीही दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इरफान खान यांच्या निधनावर ट्विट करुन दुःख व्यक्त केले. इरफान खान यांच्या निधनामुळे सिनेमा आणि नाट्य जगताची खूप हानी झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमांतल्या त्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची आठवण नेहमीच येईल.  मी त्याचे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांचे सांत्वन करतो.  

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

Leave a Comment