लॉकडाऊनच्या काळात राज्यात ३६३ गुन्हे दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई दि. ८ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६३ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३६३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी १६ गुन्हे अदखलपात्र (N.C) आहेत.

जिल्हानिहाय गुन्हे

त्यामध्ये बीड ३५, पुणे ग्रामीण २८, जळगाव २६, मुंबई २१, कोल्हापूर १६, नाशिक ग्रामीण १५, सांगली १४, ठाणे शहर १३, बुलढाणा १२, जालना १२, नाशिक शहर ११, सातारा १०, पालघर १०, लातूर १०, नांदेड १०, परभणी ८,

नवी मुंबई ८, सिंधुदुर्ग ७, अमरावती ७, ठाणे ग्रामीण ७, नागपूर शहर ७, हिंगोली ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, पुणे शहर ४, रत्नागिरी ४, सोलापूर शहर ४, नागपूर ग्रामीण ४,

भंडारा ४, पिंपरी- चिंचवड ४, चंद्रपूर ३, रायगड २, धुळे २, वाशिम २, यवतमाळ १, औरंगाबाद १ (एन.सी), यवतमाळ १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १५५ गुन्हे दाखल झाले आहेत

, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, titktok व्हिडिओ शेअर प्रकरणी १६ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.

तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत १९६ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

बीड

बीड  जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३५ वर गेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणारी पोस्ट आपल्या फेसबुकवरून शेअर केली होती. त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

सांगली

सांगली जिल्ह्यात, सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १४ वर गेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींनी कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणारा टिकटॉक विडिओ बनवून त्यात काही नामवंत समाजसेवकांवर अश्लील असे आरोप करणारे भाष्य केले होते

आणि सदर व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

अफवांवर विश्वास नको

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.

Leave a Comment