अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जास अपात्र, ‘हे’ आहे कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- नवीन पीक कर्जासाठी पहिले कर्ज भरलेले असणे गरजेचे असते. राज्य शासनाने कर्जमाफी केली आणि पहिल्या दोन टप्प्यात अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले.

परंतु लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद असल्याने तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अडचणी आल्या असून या शेतकऱ्यांचे कर्ज जैसे थे असल्याने सुमारे २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहेत.

तिसरी यादी प्रसिध्द करण्यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आल्याने ही यादी सरकारने थेट बँकांना पाठविली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला जिल्ह्यातील २६ हजार पात्र शेतक-यांची यादी प्राप्त झाली आहे.

मागील दोन याद्यामध्ये नावे असलेल्या दोन हजार शेतक-यांना तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीस पात्र शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण केले जाते.

शेतक-यांनी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा दिल्यानंतर शेतक-यांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा होते. ही रक्कम जमा झाल्यानंतर शेतकरी कर्जमुक्त होऊन पुन्हा नवीन कर्ज घेण्यास पात्र होतात.

सध्या लॉकडाऊन असल्याने सेतू केंद्रांवर गर्दी होईल, या भितीने सरकारने आधार प्रामाणिकरणाचे पोर्टल बंद केले आहे. त्यामुळे तिस-या यादीतील पात्र शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण रखडले असून, हे शेतकरी नवीन कर्ज घेण्यास अपात्र ठरले आहेत. तसेच कर्जवितरणही ५० टक्केच झाले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment