अहमदनगर ब्रेकिंग: गोळीबाराने श्रीरामपूर हादरले, एक ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- जागेच्या वादातून आज रात्री गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबार एक ठार झाला.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटे वस्तीवर ही घटना घडली. या घटनेमुळे श्रीरामपूर तालुका हादरला आहे.

गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणीवाडगाव) हे मयताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, लोटेवस्ती येथेल वायकर व साळवे यांच्यात जागेवरू वाद होता.

या कारणावरून त्यांच्यात आज सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास पुन्हा वाद झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले.

त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला.साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तेथील काही तरुणांनी त्याला तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले.

परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तेथे तैनात करण्यात आला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment