लॉकडाऊन शिथिल होताच अपघात वाढले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  एका बाजूला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोकांना घरी जाण्यासाठी शासनाकडून परवाणीगी मिळाल्याने ते आपापल्या जिल्हयात व राज्यात परतले आहेत. वेगवेगळ्या झोननुसार लॉकडाऊनमध्ये मोकळीक दिली गेल्याने लोकांचा प्रवास वाढला असून त्याचवेळी कोरोना बाधित रुग्णांचा आकडाही गुणाकाराच्या पटीत वाढत आहे, ही खूपच भयंकर अवस्था आहे.

परंतु उद्योग धंदे सुरू न झाल्यास कोरोना नाही तर उपासमारीनेच अधिक मृत्यू होतील. पारनेर तालुक्यातील सुपा येथे पुणे,नगर महामार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली असल्याचे दिसून आले.

मालवाहतूक वाहनांसह खासगी वाहनांची संख्या देखील जास्त दिसत होती.सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन आहे, परंतुअत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू आहे. तसेच लॉक डाऊनमध्ये अडकून पडलेल्या लोकांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी सुध्दा देण्यात आली आहे.

झोन नुसार काही भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून महामार्गा वरील वाहतूक वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.

मालवाहतूक, खासगी वाहने, दुचाकी व चार चाकींच्या संखेतही लक्षणीय वाढ झाली आहे. यात एक समाधानाची बाब म्हणजे सर्वांच्या तोंडाला मास्क लावलेले आढळले.

म्हणजेच जागृक नागरिक आता शासनाने सांगण्यापेक्षा स्वत:च स्वत:च्या जीवाची व आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण दक्षता घेत आहेत .

गेली ५० पेक्षा जास्त दिवस वाहानाविना एकाकी असलेले सर्वच महामार्ग आता वाहनांनी गजबजू लागले असून अपघातांच्या संखेतही वाढ होताना दिसत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment