अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- सुपे जवळ कंटेनरच्या भीषण अपघातात शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता तालुक्यातील उक्कलगाव आठवाडी येथील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील सुपे गावाजवळ घडली.

दत्तात्रय लक्ष्मण गांगुर्डे (वय २७), केशव हरिभाऊ बर्डे (वय ३०) हे शिरूरहून मोटारसायकलवरून घरी येत होते. सुप्यानजीक हाॅटेलात नाश्ता केला. तेथून नगर जवळील नांदगाव शिगंवे जवळपास आले असता,आपला मोबाइल हाॅटेलतच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यामुळे पुन्हा ते दोघे नांदगाव शिंगवेहून माघारी गेले. मात्र, सुप्यानजीक येताच शिरूरहून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर व मोटारसायकलची धडक झाली.

दुर्दैवाने रात्रीची वेळ असल्याने त्या दोघांचे मृतदेह रात्रभर जागेवरच पडून होते. सकाळीच स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

पुढील कारवाई झाल्यानंतर मृतांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले. कोरोना प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन सुरू असल्याने ते इतर काही कामगार वीटभट्टीवर कामास होते.

सुटी असल्यामुळे इतर काही महिला व पुरुष कामगार ट्रकमधून आठवाडीत आधी घरी आले होते. हे दोघे मोटार सायकलवरून घरी येत होते. कंटेनर जबरदस्त धडकेने चेंदामेंदा झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment