गाईची अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानुसार लॉकडाऊन दरम्यान जमावबंदी आहे. परंतु या जमावबंदीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशातील अलीगड येथे नागरिकांनी चक्क गाईची अंत्ययात्रा काढली.

या प्रकरणी १५० जणांच्या विरोधात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अलीगडमधील जवां पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मैमडी गावात घडली.

दिनेश चंद्र शर्मा यांच्या गाईचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यानंतर गाईचे अंत्यसंस्कार करण्याची योजना बनवली. ग्रामस्थांनी गाईची अंत्ययात्रा काढायची असा निर्णय घेतला.

त्यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागही घेतला. गाईच्या अंत्ययात्रेत या ठिकाणी १०० महिला आणि ५० पुरुष सहभागी झाले होते.

गावातील एका व्यक्तीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनेची माहिती मिळताच गावात दाखल झाले.

पोलिसांना पाहताच अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी पळण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी जेसीबी मागवून गाईला दफन केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment