कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ठोक व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यवहार अत्यावश्यक सेवेत येत असल्याने शहरातील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी.

तर शेतकरी व ग्राहकांच्या सोयीसाठी भाजी व फळ बाजार पुर्वीप्रमाणे मुख्य मार्केटमध्ये भरविण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. असोसिएशनच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांना देण्यात आले.

कोठी येथील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, फळे, फुले इत्यादींचा होलसेल व्यापार परंपरागत चालू आहे. कोरोना महामारीचे संक्रमण थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आवहानाला प्रतिसाद देत लॉकडाऊन काळात बाजार समिती आवारात गर्दी होत असल्याने सर्व व्यापार्‍यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.

मात्र लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाला असून, यामध्ये अनेक व्यापार व उद्योजकांना सवलती देऊन ते सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यवहार अत्यावश्यक सेवेत येते.

शेतकरी, शेतीपूरक व्यावसायिक व कामगारांचे अर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय व भाजीपाला विभाग पुरवठा सुरळीत सुरु करण्याची परवानी मिळण्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर फिजीकल डिस्टन्ससह शासनाच्या सर्व नियमांचे पालन मुख्य बाजार समिती येथील आडत व्यावसायिक करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच कोठी येथील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजी, फळ विक्रीचा बजार केडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरविण्यात येत असून, ते शेतकरी व ग्राहकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. शहरातील मुख्य बाजार समिती मध्यवर्ती भागात असून, केडगावला जाऊन विक्री करणे व खरेदी करण्यास वाहतुकीचा खर्च वाढत आहे.

शहरातील मुख्य बाजार समिती हे सोयीचे ठिकाण असल्याने येथेच पुर्वीप्रमाणे भाजी व फळ बाजार भरविण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी माजी संचालक नंदकिशोर शिकरे,

असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे, पिनू कानडे, गणेश लालबागे, अनिलकुमार बजाज, सुनील शेलार, विजू मेजर, नंदू बोरुडे, मोहन गायकवाड, अशोक निमसे, तानाजी कर्पे, विकास तिवारी, किशोर बोडखे, अनिल ठूबे, पियुष कर्डिले, संभाजी शिंदे, दर्शन विधाते आदींसह व्यापारी उपस्थित होते.

मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी………………. शहरातील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी. तर शेतकरी व ग्राहकांच्या सोयीसाठी भाजी व फळ बाजार पुर्वीप्रमाणे मुख्य मार्केटमध्ये भरविण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

यावेळी माजी संचालक नंदकिशोर शिकरे, असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे, पिनू कानडे, गणेश लालबागे, अनिलकुमार बजाज, सुनील शेलार, विजू मेजर, नंदू बोरुडे, मोहन गायकवाड, अशोक निमसे, तानाजी कर्पे, विकास तिवारी, किशोर बोडखे, अनिल ठूबे, पियुष कर्डिले, संभाजी शिंदे, दर्शन विधाते आदि.

(छाया-वाजिद शेख-नगर) शहरातील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी. तर शेतकरी व ग्राहकांच्या सोयीसाठी भाजी व फळ बाजार पुर्वीप्रमाणे मुख्य मार्केटमध्ये भरविण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगर भाजीपाला,

फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांना देताना माजी संचालक नंदकिशोर शिकरे, असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे, पिनू कानडे, गणेश लालबागे, अनिलकुमार बजाज आदि.

Leave a Comment