‘निसर्गा’चा अहमदनगर जिल्ह्याला तडाखा, या दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाचा मुंबई पाठोपाठ नगर जिल्ह्याला देखील चांगलाच तडाखा बसला आहे, अकोले व संगमनेर तालुक्‍याला सर्वाधिक नुकसान झाले आहे.

अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली आहेत. तसेच साडेसातशेपेक्षा जास्त घरांची हानी झाली आहे. याचसोबत  ६३२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

बुधवारी आलेल्या  निसर्ग चक्रीवादळामुळे नगर जिल्ह्यात दिवसभर वादळ, वारे आणि रिमझिम पाऊस होता. पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर, संगमनेर,कोपरगाव, श्रीरामपूर या भागात सायंकाळनंतर जोरदार वारे व मुसळधार पाऊस झाला.

यामध्ये अकोले तालुक्‍यातील लहित येथे वाऱ्याने अंगावर भिंत कोसळून सागर पांडुरंग चौधरी (वय ३२) हा गंभीर जखमी  झाला. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो संगमनेर येथील  मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करत होता.

वादळी वाऱ्याने २३ जनावरे देखील दगावली आहेत. तर नगर,संगमनेर तालुक्‍यात प्रत्येकी  एक, शेवगाव तालुक्‍यात दोनजण जखमी झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment