…आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड… विजय औटी यांची आ.नीलेश लंकेवर टीका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामकाजाची तुलना माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीशी होणार आहे. ते सोपे नाही. लग्न करणे सोपे आहे, परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड असते.

त्यामुळे पुढचे दिवस आपलेच आहेत. वर्ष, दीड वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सगळे सुरळीत झालेले दिसेल. आपण रण सोडणारी माणसं नाहीत. शिवसैनिक कधीही रण सोडत नसतो, असे माजी आमदार विजय औटी म्हणाले.

परानेर तालुक्यातील कोहकडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद््घाटनानिमित्त औटी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मनातील भावना मोकळेपणाने मांडल्या.

यावेळी काशिनाथ दाते, गणेश शेळके, बाबासाहेब तांबे, विकास रोहोकले, राहुल शिंदे, शंकर नगरे, नितीन शेळके, सरपंच डॉ. साहेबराव पानगे आदी उपस्थित होते.

निवडणुकीतील यश व अपयश हे तात्पुरते असते. निवडणुकीतील निकाल फिरतात. कधी बहुरंगी, तर कधी दुरंगी लढती होतात. या निवडणुकीत पंकजा मुंडे, राम शिंदे या मंत्र्यांनाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे माझ्या मनामध्ये पराभवाचे अजिबात वैषम्य नसल्याचे विजय औटी यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment