बिग ब्रेकिंग : राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गतचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. राज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत.

आणखी एक महिना राज्यातील जनतेला टाळेबंदीतच काढावा लागणार आहे. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून या दरम्यान अनेक निर्बंध मात्र टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येणार आहेत.

राज्यात लॉकडाऊन दरम्यान जिल्हाबंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. ही बंदी यापुढेही कायम राहणार आहे

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील, असे सांगितले होते.

काही भागातील अधिकारी पुन्हा लॉकडाऊन करण्याची परवानगी मागत आहेत. माझी तशी इच्छा नसली तरी वेळ पडल्यास संबंधित परिसर लॉकडाऊन करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशात कोरोनाची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणं समोर आली आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 2 लाख 10 हजार 120 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनामधून आतापर्यंत 16 हजार 475 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment