साधु-संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना लांच्छनास्पद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ तालुक्यातील वारकरी संघटना व सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेली फिर्याद खोटी असून ती त्वरित मागे घ्यावी,

अशा मागणीचे निवेदन अकोले तालुका वारकरी संघटनेने तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले. या भुमिपुत्राने तालुक्याचा नावलौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आहे.

काही नास्तिक प्रवृत्तीच्या लोकांनी शाब्दिक दोष काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खोटी फिर्याद दाखल केली आहे. साधु-संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना लांच्छनास्पद आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना विवेक महाराज केदार, शांताराम महाराज पापळ, अरुण महाराज शिर्के, कैलास महाराज आहेर उपस्थित होते. खोटी फिर्याद मागे न घेतल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के. डी धुमाळ, वारकरी संघटनेचे माजी अध्यक्ष दीपक महाराज देशमुख, रोटरी क्लब ऑफ अकोल्याचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य,

माजी अध्यक्ष सचिन देशमुख, अध्यक्ष सचिन शेटे, ज्ञानेश्वर आरोटे, विनेश देशमुख, दत्ता अस्वले आदींनीही सोमवारी निवेदन दिले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment