नागवडे कारखान्याचे ‘एवढ्या’ गाळपाचे उद्दिष्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : मागील वर्षी जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऊस लागवड कमी झाल्याने आणि उपलब्ध उसांपैकी बराच ऊस चाऱ्यासाठी वापरल्याने संबंध महाराष्ट्रात उसाचे गाळप सरासरीपेक्षा कमीच झाले.

नागवडे कारखान्याचे ऊस उपलब्धतेअभावी गाळप बंद होते. आगामी हंगामात मात्र मुबलक ऊस उपलब्ध आहे. कारखान्याने या हंगामात ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी रविवारी सांगितले.

रोलरचे विधिवत पूजन केल्यानंतर नागवडे म्हणाले, एफआरपीप्रमाणे ऊसदर देत व प्रसंगी ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा अधिक दर दिलेला आहे. बापूंचा वारसा चालवण्याचे काम व्यवस्थापन करत आहे.

बापूंचे स्वप्न असलेल्या २६ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाली आहे. या हंगामापासून सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

सहवीज निर्मिती प्रकल्पामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे सभासद, शेतकऱ्यांना अधिक ऊसदर देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न राहील. काही तांत्रिक अडचणींमुळे गेले काही दिवस बंद असलेल्या

आसवनी प्रकल्पाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून हा प्रकल्पही या हंगामात पूर्ववत कार्यान्वित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कारखान्याचे संचालक विश्वनाथ गिरमकर, श्रीनिवास घाडगे, अरुण पाचपुते, योगेश भोईटे, विलास काकडे, प्रा. सुनील माने, युवराज चितळकर, शरद जगताप, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, कारखान्याचे मुख्य अभियंता रामचंद्र मखरे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment