अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. यात मुंबई , पुणे अव्वल हे जिल्हे अव्वल राहिले. परंतु आता नगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढले आहे.
प्रशासन काटेकोर काळजी घेऊनही जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी मंगळवारी आलेल्या माहितीनुसार १ हजार ७६ झाली आहे. यात ६६६ रुग्ण बरे झाले असून ३८४ ऍक्टिव्ह केस आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नगर शहरात सापडलेले आहेत. त्या खालोखाल संगमनेर तालुक्याचा नंबर लागतो. दरम्यान, मृत्यूमध्ये संगमनेर तालुका आघाडीवर असून या ठिकाणी सोमवारच्या आकडेवारीपर्यंत 13 रुग्णांचा,
नगर शहरात 5 रुग्णांचा तर पारनेर, श्रीरामपूर प्रत्येकी दोन आणि राहाता, कोपरगाव अकोले आणि जामखेडमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews