खासदार सुजय विखेंचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र म्हणाले संचारबंदी करा, अन्यथा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे.

अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाची जनता संचारबंदी करा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खा. डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. नगर शहर व जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन, अहोरात्र राबत आहे;

मात्र कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संशयितांची टेस्टिंग आणि ट्रेकिंग या दोन खात्रीशीर उपाययोजना आपल्या पुढे आहेत.

एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि सध्या असलेल्या सुविधांवर पडणारा ताण या कोंडीत आपण सर्व जण सापडलो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

एक महिन्यापूर्वी नगरमध्ये कोरोना प्रसाराचा वेग प्रतिदिवस एक रुग्ण असा होता. तो आता दिवसाला दोनशे रुग्ण असा झाला आहे. वाढती रुग्णसंख्या, रुग्णांपर्यंत पोहोचण्यात येत असलेले अपयश, या सगळ्यांचा परिपाक साथीच्या आजाराच्या स्फोटात होण्याची दाट शक्यता आहे.

एक खासदार म्हणून नव्हे, तर एक डॉक्टर म्हणून या सर्व गोष्टीकडे बघत असताना कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी जनता संचारबंदी लागू करणे हाच पर्याय मला सध्या दिसतो आहे.

त्यामुळे नगर शहरात व ज्या तालुक्यांमध्ये जिथे रुग्णवाढीचा आकडा तीन अंकी आहे, अशा ठिकाणी पाच दिवसांची जनता संचारबंदी घोषित करण्यात यावी, अशी सूचना विखे यांनी पत्राद्वारे केली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment