संकटाच्या काळात लोकसेवेला महत्त्व: आ. रोहित पवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- संकटाच्या काळामध्ये लोकांच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. आ. संग्राम जगताप यांनी नागरिकांवर आलेल्या कोरोना संसर्ग विषाणूच्या संकटाच्या काळामध्ये गरजूंना मदत करण्याची मोठी कामगिरी केली आहे.

आयुर्वेद कॉलेज येथे कोरोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा कोरोना रुग्णांना देण्याचे काम केले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून काम केल्यास समाजामध्ये अनेक लोक पुढे येऊन मदत करत असतात.

कोरोनाच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे रुग्णही मोठ्या प्रमाणात निघत आहेत. घाबरून न जाता योग्य उपचार घेऊन कोरोना आजारावर आपण सर्वांनी मात करायची.

आयुर्वेद कॉलेजला ऐतिहासिक वारसा आहे. या कॉलेजमध्ये गुरु आनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करुन समाजामध्ये एक दिशादर्शक काम ठरेल, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.

आयुर्वेद कॉलेज येथील गुरू आनंद कोविड सेंटरला आ. रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी आ. संग्राम जगताप, माजी नगरसेवक संजय चोपडा, मर्चंट बॅकेचे संचालक अमित मुथा,

कमलेश भंडारी, अर्बनचे संचालक शैलेश मुनोत, धनेश कोठारी, रोशन चोरडिया, राजेंद्र फाळके, अभिजित खोसे, योगेश गलांडे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. जगताप म्हणाले की, सकारात्मक दृष्टीकोनातून व सामाजिक बांधिलकीतून काम करणे गरजेचे आहे. आजचा युवक यासाठी पुढे येत आहे. त्या माध्यमातून समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहचत आहे.

आयुर्वेद कॉलेजमध्ये ३0 बेडचे गुरू आनंद कोविड सेंटर सुरू आहे. या संकटावर मात करण्यासाठी बडी साजन येथे लवकरच १00 बेडचे कोविड सेंटर सुरु करणार आहे, असे ते म्हणाले.

 

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment