ब्रेकिंग : रेल्वे इंजिनची धडक, इतक्या मेंढ्या झाल्या ठार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- मागील काही महिन्यात जिल्ह्यात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पाळीव प्राण्यांचा बळी जात असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गुरुवारी श्रीरामपुर तालुक्यात रेल्वे इंजिनची धडक होऊन ४० मेंढ्या ठार झाल्याची घटना घडली. 

यामध्ये रेल्वे इंजीनची जोरदार धडक बसुन ४० मेंढ्या मृत झाल्या आहेत. मागील काही दिवसापूर्वीही अशीच घटना घङली होती.या बाबत माहिती अशी की,

भुयारी पुलाखाली सुमारे चार ते पाच फुट उंचीवर पावसाचे पाणी साचल्याने ५० मेंढ्याचा मालक असलेल्या मेंढपाळने ही जनावरे रेल्वे रस्ता ओलंडण्यासाठी रेल्वे रुळ वरुण नेत असताना विना डब्बे असलेले भरधाव इंजिनने जोराची धड़क देत पुढे गेले.

यात ४० मेंढ्या मृत झाल्या. ही घटना काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमरास घडली. जर या ठिकाणच्या भुयारी मार्गात पाणी नसते तर त्याच मेंढ्या रुळावरुण न जाता भुयारी मार्गातून गेल्या असत्या व त्यांचे प्राण वाचले असते.

दरम्यान रेल्वे पुलाखालील पावसाचे पाणी काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच सदर मेंढपाळाला नुकसान भरपाई द्यावीत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment