पिक विमा मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पिक विमा मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही महिन्यापासून शेवगाव तालुक्यामध्ये सततच्या लॉकडाऊन व जमाव बंदी असल्यामुळे तसेच एसटीचा प्रवास बंद झाल्यामुळे शेतकरी उपस्थित राहिले. तरी सेतुकेंद्रा मध्ये सर्व्हर चालत नव्हते.

तसेच सर्वर चालू झाले. तर एक ते दीड तास एक अर्ज भरण्यासाठी वेळ लागत होता. त्यामधील काही सेतूकेंद्र कोरोना मुळे बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही.

त्यातच शेवगाव तालुक्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरणे अत्यंत आवश्यक आहे.

आधीच शेतकरी कोरोना मुळे मेटाकुटीला आला आहे, दुधाला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही,हाताला काम नाही आणी पीक विमा भरला नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

त्यामुळे १५ ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची मुदतवाढ मिळावी, या मागणीचे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे पाठवून करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment