तो’ एकाला सोडवायला गेला आणि परतलाच नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील एक तरुण एका जणाला नगर येथे कामावर जायचे असल्याने तो दुचाकीवरून त्यास राहुरी फॅक्टरी येथे बसस्टँडवर सोडण्यासाठी गेला. परंतु त्यानंतर तो माघारी परतलाच नाही. 

शोध घेतल्यानंतर एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. रोहन बबन ओहळ (वय १९ ) असे  या तरुणाने नाव असून त्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

रोहन हा सकाळी एका जणाला नगर येथे कामावर जायचे असल्याने तो दुचाकीवरून त्यास राहुरी फॅक्टरी येथे बसस्टँडवर सोडण्यासाठी गेला होता. तो बराच वेळ होऊनही घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला.

दरम्यान ‘तुमची दुचाकी गुहा-तांभेरे रस्त्यालगत पडली आहे’ असा एक फोन त्याच्या वडिलांना आला. ते त्या ठिकाणी गेले असता तेथून जवळच असणाऱ्या

विहिरीच्या पाण्यात त्याच्या चपला तरंगताना दिसून आल्या. त्यानंतर शोध घेतला असता रोहनचा मृतदेह विहिरीच्या कपारीला दिसून आला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment