मनपा बेवारस, महापौर असक्षम व आयुक्तांचे कोणी ऐकत नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर शहरातील दुबळे प्रशासन या सर्वांमध्ये महापौर व आयुक्त यांना तितकेच जबाबदार धरत युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांनी त्यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे.

अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसापासून दररोज करोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, मनपा अधिकाऱ्याची काय कार्यक्षमता आहे, हे रोज उघड होत आहे,

अशा संकट समयी सत्ताधारी व महापौर यांचे प्रशासनावर नियंत्रण असणे खूप महत्त्वाचे असते परंतु असे कुठेच दिसून येत नाहीय , १२ मुर्तदेह एकाच ॲम्बुलन्स मध्ये टाकण्याचा प्रकार,

कचरा घोटाळा किव्हा मनपा कार्यालयात अत्याशक सेवा वगळता मनपा बंद असो, महापौर म्हणून जसे यंत्रणा राबवायला हवी होती प्रशासनावर जसे नियंत्रण पाहिजेल तसे कुठेच दिसले नाही,

त्याचबरोबर आयुक्त देखील पूर्णपणे हातबल झाल्याचे चित्र आहे , त्यांनी केलेल्या सूचना अधिकारी व कर्मचारी देखील ऐकत नाही असा प्रकार मनपा मध्ये होत आहे.

त्यामुळेच हा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. ह्या सर्व प्रकारात तातडीने सुधारणा न झाल्यास अहमदनगर शहर युवक काँग्रेसच्या वतीने ठोस भुमिका घेतली जाईल, असा इशारा युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment