एका दिवसात सात रुग्णांचा बळी, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्ण संख्येने ओलांडला अकरा हजाराचा आकडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने आणखी सात जणांचा मृत्यू होऊन बळींची संख्या १२४ झाली. २४ तासांत रुग्णसंख्येत ६४७ ने वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ११२७३ झाली आहे.

व उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३४०८ झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये २८५ नागरिक बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये मनपा हद्दीतील ४०, पाथर्डी ४, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर १, कँटोन्मेंट १०, नेवासे १३,

पारनेर १२, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव ५, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्ह्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

एकूण ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा १८५, संगमनेर २२, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण २६, श्रीरामपूर ३७ , कॅन्टोन्मेंट १३, नेवासे २२, श्रीगोंदे १५,

पारनेर १८, अकोले ६, राहुरी ४, शेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ३, कर्जत १७ आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील ४ अशा रुग्णांचा समावेश आहे

दरम्यान, ४७८ रुग्ण बरे होऊन बुधवारी घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या ७७४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६८.६७ टक्के आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment