सुशांतसिंह आत्महत्या: मंत्री बाळासाहेब थोरातांची प्रथमच परंतु महत्वाची प्रतिक्रिया,म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. आता हा तपास CBI कडे सोपावण्यात आला आहे.

रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत. यात राजकारणही तापू लागले आहे. आता यावर प्रथमच काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देताना विरोधकांना टोला हाणला आहे. काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्यानं आतापर्यंत यावर थेट भूमिका मांडली नव्हती.

नगरमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज यावर भाष्य केलं.

सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत आहे का, असं थोरात यांना विचारण्यात आलं.

त्यावर, ‘या गोष्टीचं कोणीही राजकारण करू नये,’ एवढंच ते म्हणाले. त्याचप्रमाणे नुकतेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पार्थ पवार यांची बाजू उचलून धरत आघाडी सरकार लवकरच विसर्जित होईल होईल, असे वक्तव्य केले होते.

याबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘रामदास आठवले यांनी नेमके काय वक्तव्य केले आहे, ते मी ऐकले नाही. परंतु भाजपचे लोक दिवास्वप्न पाहत आहेत

की राज्यातील हे सरकार जाईल, आपले सरकार येईल. पण त्यांची ही भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही. असे थोरात यांनी स्पष्ट केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment