नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात; जखमींमध्ये महिलांचा समावेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा परिसरातील गरीब महिला उपजिविका भागविण्यासाठी रोजंदारीवर शेती कामाला जातात. यासाठी वाहनातून जा-ये करत आसतात.

रविवारी (दि.१६) सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास कामावरुन परतत येत असताना वाहनाचे टायर फुटून वाहन पलटी झाले. यामध्ये महिला जखमी झाल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, माळीचिंचोरे शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावर हॉटेल दत्त प्रसाद नजीक सांयकाळी ६.०० वा. शेती कामावरुन परतणाऱ्या महिलांच्या पिकअप वाहनाचे टायर फुटून झालेल्या

अपघात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आसून आठ महिलांसह एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात प्रथमोपचार करुन गंभीर जखमींना नगर

येथे हलविण्यात आल्याची माहीती वैद्यकिय सुत्रांनी दिली. यामध्ये वर्षा अशोक देव्हारे (वय ४५), मनिषा माळी (वय ३०), मिरा मच्छिंद्र नजन (वय ५५), प्रगाबाई चिंधे (वय ५०),

मनिषा तुकाराम नजन (वय ३०), मनिषा देविदास देव्हारे (वय १४), सुनिता राजू बर्डे (वय ५०), सुनिता संदिप बर्डे (वय २५), शांता भाऊसाहेब सातपूते (वय ५०) सर्व राहणार माळिचिंचोरे ता.नेवासा या महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

त्यांच्यावर नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहे. हिरा संजय देव्हारे (वय ३५) व वर्षा शेळके

(वय ४०) या महिला गंभीर जखमी झालेल्या आसून त्यांना नगर येथे पुढिल उपचार्थ हलविण्यात आले आहे. या घटनेबाबत रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment