निळवंडे कालवेग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- अकोले, संगमनेर निळवंडे कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत गतीने प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदा, महसूल प्रशासनाला याबाबतीत प्रलंबित मागण्या व प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले.

कालवेग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. संगमनेर कारखाना

विश्रामगृहावर निळवंडे धरणग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे मार्गदर्शक जेष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मंत्री थोरात

यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. किरण लहामटे, मीनानाथ पांडे, पाटीलबुवा सांवत, भानुदास तिकांडे, रवी मालुंजकर, सुभाष हासे आदी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment