‘ह्या’ धरणांतील पाणीसाठा वाढला; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे.

सातत्याने पडणाऱ्या पावसाने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या धरणांत तासागणिक पाण्याची आवक वाढत चालली आहे. 16 ऑगस्ट रोजी पहाटे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

दरम्यान निळवंडेतून प्रवरा नदी पात्रात रात्री 3848 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातही काल सायंकाळी 7 वाजता पाणीसाठा ६ हजार ८५० दलघफू (82 टक्के) झाला आहे.

या धरणातून 1993 क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत.

मागील 24 तासांत भंडारदरात तब्बल 529, निळवंडे 519 आणि मुळा धरणात 858 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले आहे. पाऊस वाढल्यास निळवंडेचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रवरा नदीपात्रात अधिक पाणी सोडण्यात येणार आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

* दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनीही प्रफुल्लित :-पाणलोटात पाऊस सुरू असल्याने दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी धरण समुहातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक झाला आहे.

या प्रकल्पात सुमारे 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा काल सकाळी 8970 दलघफू (72 टक्के) नोंदवला गेला.

सुमारे बाराशे दलघफू क्षमतेच्या वडज धरणातील पाणीसाठा 1013 दलघफू (86 टक्के) होता. पाण्याची आवक होत असल्याने या धरणातून मीना नदीत व कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment