धरण उशाला व कोरड घशाला….’त्यांचा’पाणीपुरवठा दहा दिवसांपासून बंद !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  मुळानगर येथील पाण्याचा पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून खंडीत झाल्याने पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी स्थानिक रहिवाशांची पायपीट सुरू झाली.

मुळा पाटबंधारे प्रशासनाच्या दुर्लक्षाने रहिवाशांवर ही वेळ आली. २६ टीएमसीच्या मुळा धरणाचा पाणीसाठा शनिवारी ७५ टक्क्यांवर पोहचला.

मात्र, धरणा लगतच्या मुळानगर येथील रहिवाशांची अवस्था धरण उशाला व कोरड घशाला अशी झाली. मुळानगर व वरवंडी संयुक्त ग्रामपंचायत अंतर्गत मुळानगर परिसर येत असताना

या भागातील ग्रामस्थांच्या मतावर निवडून येणारे सदस्य व पदाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने पंचायतीचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला.

वसाहतीतील मूळ कर्मचाऱ्यांचे वास्तव्य कमी असल्याने रिकाम्या खोल्यात ममजुरीनिमित्त आलेल्या नागरिकांचे येथे वास्तव्य आहे.

परंतु दहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाल्याने परिसरातील पुरुष, महिला यांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलेली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment