राजू शेट्टी तर सरड्यासारखे रंग बदलणारे – सदाभाऊ खोत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  राजू शेट्टी प्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी वर टीका केली आहे. 

तसेच आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच तुम्ही आमदार आणि खासदार झालात असा टोलाही त्यांनी शेट्टी यांना लगावला आहे. दूध दरावरून सोलापूर मध्ये राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जोरदार पलटवार केला आहे. सांगलीच्या इस्लामपूर मध्ये ते बोलत होते.

दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

यांच्यावर भंपक आणि फालतू माणूस अशा शब्दात टीका केली होती या टीकेला उत्तर देताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांनी राजू शेट्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना मुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाले, दुधाला दर नाही,

शिवाय शेतकऱ्यांना सरासरी 34 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. महायुतीही आंदोलन करत आहे. तर शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना पण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आली आहे.

त्या संघटनेच्या नेत्यांनी शेतकरी प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे, असं मला वाटतं, त्यामुळे स्वाभीमानी च्या संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक महत्त्व द्यावं. ठीक आहे आम्ही फालतू माणसं होतो पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली त्यामुळे तुम्ही आमदार दोनवेळा खासदार होऊ शकला

त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते बनवून तुम्ही राज्य करू शकला,पण मला त्यांचं सारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही, मला वाटतं त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असेल तर सदाभाऊचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धीच्या झोतात राहू शकत नाही, असे वाटत असेल त्यामुळेच अशा भंपक माणसाविषयी फार प्रत्येक करावा

अशी माझी इच्छा नाही. त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा सदाभाऊ विषयावर आवाज उठविण्यासाठी अजून चार वर्षे बाकी आहेत 2024 ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो, असा इशारा खोत यांनी दिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment