महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस हा लाचार पक्ष !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. या नाराज झालेल्या 11 आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विकास निधी वाटपावरून कॉंग्रेस आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून भाजपा खासदार सुजय विखे यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर तसेच मंत्रीपद घेतलेल्या मंत्र्यावर टीकेची तोफ डागली आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस हा लाचार पक्ष झालेला आहे, कॉंग्रेस हा लॉटरी सिस्टममध्ये महाराष्ट्राच्या सत्तेत येऊन बसला आहे,

त्यामुळे ते स्वतःच्या आमदारांकड़े कमी आणि मंत्रीपद सांभाळण्यात जास्त व्यस्त असल्याची टीका नगरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस हा ५ व्या नंबरचा पक्ष आहे, त्यांना जनतेने नकारलेले आहे. त्यामुळे लॉटरी सिस्टमनुसार ते सत्तेत आले आहे. जनतेने नकार दिल्यानंतर देखील त्यांना १० मंत्रीपद मिळाले आणि म्हणून ते मंत्रीपद सांभाळण्यामध्ये व्यस्त आहेत.

त्यांना आमदारांकड़े लक्ष द्यायला वेळ नाही. ते स्वःत लाचार झालेले असल्यामुळे त्यांच्या आमदारांनी विरोध केला आहे. आघाडी सरकारमधील कलह आज जनतेसमोर असल्याची प्रतिक्रिया खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment