कोरोनाने आणखी २० जणांचा घेतला बळी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने आणखी २० जणांचा बळी घेतला. बळींची एकूण संख्या २६० झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४२६ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या १८ हजार १९ झाली.

सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवार सायंकाळी सहापर्यंत रुग्णसंख्येत ४२६ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार २२८ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ५२, अँटीजेन चाचणीत २५९ आणि खासगी प्रयोगशाळेत ११५ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात तपासणीच मनपा २५, पाथर्डी १, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर ५, पारनेर ९, राहुरी १, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटलमधील ९ रुग्ण आढळले. अँटीजेन चाचणीत मनपा ३४, राहाता ३३, पाथर्डी ६, श्रीरामपूर २०, कॅन्टोन्मेंट ७,

नेवासे ६, श्रीगोंदे ४०, पारनेर ५, अकोले ३८, राहुरी २, शेवगाव १८, कोपरगाव २४, जामखेड २२ आणि कर्जत ४ रुग्णांचा समावेश आहे . खासगी प्रयोगशाळेत मनपा ८५, संगमनेर २,

राहाता ३, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट ७, श्रीगोंदे १, पारनेर १, राहुरी २, शेवगाव १, कोपरगाव २, जामखेडच्या १ रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment