शरद पवार यांनी एक फोन केला तरी के के रेंज चा प्रश्‍न निकाली निघेल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   के के रेंजच्या जमीन हस्तांतरास राज्य शासनाचा विरोध असल्याचे सांगत न्यायालयात दाद मागणे हा शेवटचा पर्याय आहे. याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल,

वन व मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेण्यात येउन ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले.

नगरविकास, उर्जा, आदीवासी तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके यांचे प्रतिनिधी वनकुटयाचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, निघोजचे सरपंच ठकाराम लंके,

कामगार नेते दत्ता कोरडे, राजू रोडे यांच्यासह थोरात यांच्यासोबत बुधवारी मंत्रालयात के के रेंजप्रश्‍नी बैठक पार पडली. यावेळी मंत्री तनपुरे, अ‍ॅड राहुल झावरे यांनी थोरात यांच्याकडे जमीन हस्तांतर प्रकरणी सुरू असलेल्या हालचालींची माहीती दिली.

या भागातील जमीनी बागायती आहेत. शेतक-यांनी मोठया कष्टाने त्या विकसीत केल्या आहेत. या भागात मोठया प्रमाणात धनगर समाज तसेच आदीवासी आहेत.

लष्कराकडून राज्य शासनाने जमीन हस्तांतरीत करून घेतली असेल तर त्या बदल्यात लष्करास जमीन हस्तांतरीत करणे बंधनकारक असते. परंतू त्यासाठी नगर जिल्हयातीलच जमीन देणे बंधनकारक नाही असे मंत्री थोरात यांनी सांगितले.

के के रेंजच्या हस्तांरप्रकरणी शरद पवार यांनी एक फोन केला तरी जमीन हस्तांतराचा प्रश्‍न निकाली निघेल. या प्रकरणी पवार यांची मदत घेतली जाईल असेही मंत्री नामदार थोरात यांनी सांगितले.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment