‘त्या’ शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा ; शेतात झालंय ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर मधील संगमनेर तालुक्याच्या आंबीखालसा गावातील जोठेवाडी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा विद्युत महामंडळास दिला आहे. कारण त्याच्या शेतामध्ये वीजवाहक तारा लोम्बकळत आहेत.

त्याने जीवास धोका निर्माण झाला आहे. आणि या तारा काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून घारगाव वीजमंडळाच्या कार्यालयास अर्ज या शेतकऱ्याने दिला आहे.

परंतु मागील वर्षभरापासून त्याची दखल घेतली न गेल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा दिला आहे. ईश्वर भाऊसाहेब भोर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

भोर यांनी उर्जा मंत्रालय कार्यालयास पाठविलेल्या अर्जानुसार सदर गावात गट नंबर 472 शेतीच्या क्षेत्रात दहा वर्षापासून वीजवाहक तारा व चारशे मीटर लांबीचे दोन गाळे शेतजमिनीपासून अवघ्या सहा फूट उंचीवर लोंबकळत आहे.

अशा अवस्थेत शेतात काम करणे अवघड झाले आहे. याबाबतीत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊन रितसर दुरूस्तीसाठी संबंधित कार्यालयास अर्जही दिला आहे.

पण त्यांनी सतत टाळाटाळ केली आहे. त्यामुळे पंधरा दिवसात तारा व मीटर यांच्या बाबतीत निर्णय न झाल्यास आपण आत्महत्या करू. याबाबत वरील नमूद वीज कर्मचारी जबाबदार असतील असे भोर यांनी म्हटले आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment