‘त्या’ शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ५० कोटी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग ५१६ च्या चौपदरीकरणाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला

असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर जिल्ह्य़ाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग ५१६ च्या कामाकरीता श्रीगोंदा तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने भूसंपादनापोटी ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी मंजूर झाला असल्याचे खा.विखे पाटील म्हणाले.

या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बनप्रिंप्री, तरडगाव, मांडवगण व घोगरगाव या गावातील जमिनींचे अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी. बी. दिवाण यांनी सांगितले

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment