तरुणाईपुढील चिंता: एकीकडे भरतीची प्रतीक्षा दुसरीकडे शेतीत कसण्यासाठी समीक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे असले तरी शेतकऱ्यास म्हणावे तसे आर्थिक स्वायत्त कधी मिळाले नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई, कर्ज हे जणू त्याच्या पाचवीलाच पुजलेले.

यातून निश्चित आर्थिक उत्पन्न निघत नसल्याने तरुणाई शासनाने जाहीर केलेल्या पोलीस भरतीची प्रतीक्षा करत आहे. ग्रामीण भागातील तरुणाई मैदानी सराव करीत आहे.

कोरोनाने सामान्यांचे जीवन बदलले आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले तर काहींची उपासमारीची झाली. राज्यातील लाखो सुशिक्षीत बेरोजगार तरुण पोलिस भरती प्रक्रियेसह सरकारी व खासगी नोकरीच्या शोधात आहे.

तर दुसरीकडे कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भरतीची शक्यता धूसर दिसताना पुण्या मुंबईवरून आलेले बेरोजगार शेतात काम करताना दिसत आहे.

शेतातील उत्पन्न वाढावे यासाठी शेतीची समीक्षा करून शेतीत कसण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात शेतीसह शेतीपुरक व्यवसाय केले जातात.

अहमदनगर जिल्ह्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गायीचे पालन करुन दुध व्यवसायातुन कुटूंबाला आर्थिक आधार मिळतो.

गायीना चारा-वैरण करुन शेतीकामातुन मिळालेल्या वेळेत तरुण लेखीचा सराव करतात. दिवसभर शेतीकामे आणि रात्री स्वयं-अध्ययनासह पहाटे व सायंकाळी मैदानी सरावा असा दिनक्रम ग्रामीण भागातील तरुणाईचा आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment