मुळा धरण भरण्याच्या मार्गावर, पण कोरोनामुळे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.

मुळाच्या पाणलोटातील भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाण्याची आवक सुरु असल्याने अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे.

या धरणाची 26हजार दलघफू क्षमता आहे. यात 12 तासांत 227 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे मुळा धरणात काल रात्री 24724 दलघफू साठा झाला होता.

मुळा धरणात 25437 दलघफू पाणी झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री हरिश्चंद्र गड,पाचनई, आंबित या भागात पावसाचे पुनरागमन झाले.

त्यामुळे मुळा नदीतील विसर्ग 5638 झाला होता. दुपारी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सायंकाळी हा विसर्ग 3212 क्युसेकपर्यंत घटला.

पण रात्रीही पाऊस काहीसा वाढल्याने आज पुन्हा नदीतील पाणी वाढण्याची शक्यता आहे. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने येणारे पाणी निळवंडेत सोडले जात आहे.

काल दिवसभरात या धरणात 182 दलघफू नवीन पाण्याची आवक मुळा ओव्हरफ्लोच्या मार्गावर झाली. हे पाणी निळवंडेत आल्याने निळवंडेचा साठा 7685 कायम ठेवून प्रवरा नदीत 9003 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान, १५ ऑगस्ट व त्यानंतरचा विकेंडचा काळ हा पर्यटकांसाठी पर्वणीच असतो. मुळा, भंडारदरा धरणाच्या भागात तोबा गर्दी होत असते.

निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आणि आनंद लुटण्याची संधी आणि आनंद पर्यटक घेत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment