धक्कादायक! कोरोना मृत्यूची संख्या लपवली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   अमरधाममध्ये कोरोना मृत्यूंवर अंत्यसंस्कारास विलंब होत असल्याचा प्रकार उघडीस आल्यानंतर, आता कोरोना मृत्यूच्या संख्येत तफावत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा कॉंग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे व बाळासाहेब पवार यांनी पर्दाफाश केला.

मनपा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला असून प्रशासन कोरोना मृत्यूंची संख्या का लपवतेय?, असा सवाल वारे यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना मृत्यूंवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत.

कोरोना मृत्यूच्या संख्येत तफावत असल्याचा संशय असल्याने निखील वारे व बाळासाहेब पवार यांनी आज दुपारी अमरधाम स्मशानभूमीस भेट दिली. कोरोना मृत्यूंवरील अंत्यसंस्काराबाबत मुलतानचंद बोरा ट्रस्टकडे वारे व पवार यांनी चौकशी केली असता, ट्रस्टकडून आज दुपारपर्यंत ४५६ कोरोना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितल्याचे निखील वारे यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना वारे म्हणाले की, मुलतानचंद बोरा ट्रस्टने कोरोना मृत व्यक्तींवरील अंत्यसंस्कारासंदर्भात आम्हाला पत्र दिले आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत ४५६ जणांवर अंत्यसंस्कार केल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच यासंदर्भातील बिल बूक, रिपोर्ट त्यांनी दाखविले आहेत.

कोरोना मृत्यूंचा आजचा सरकारी आकडा ३०० आहे तर अमरधाममध्ये ४५६ जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत मोठी तफावत आढळून येत आहे.हिंदु धर्मातील व्यक्तींवर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत.

इतर जाती-धर्मातील कोरोना मृत्यूंचा आकडा वेगळा आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा मोठा आहे. प्रशासन करोना मृत्यूंची संख्या का लपवित आहे, हे प्रशासनाने स्पष्ट केले पाहिजे. तसेच मृत्यूंचा खरा आकडा जतनेला सांगितला पाहिजे, अशी मागणी वारे यांनी केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment