किसान रेल्वेच्या पार्सल वाहतुकीच्या सेवा सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- शेतकऱ्यांच्या नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा रेल्वे मंत्रालयाने सुरु केली आहे. या किसान रेल्वेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील सर्व प्रकारचा भाजीपाला आणि फळ,

फुलांची वाहतुक इतर राज्यात सुरक्षित आणि वेगाने पोहोचण्यासाठी ही खास रेल्वे गाडी सुरु झाली असून नगरमधील शेतकरी, व्यापारी या पार्सल गाडीचा लाभ घेत आपला माल या गाडीद्वारे इतर राज्यात पाठवत आहेत.

दर मंगळवारी कोल्हापूरहून हि रेल्वे सुटणार असून दुपारी दोन वाजता किसान ट्रेन नगर रेल्वे स्थानकावर येईल. तर प्रत्येक शुक्रवारी मनमाड येथून रात्री दहा वाजता नगर स्थाकावर येईल.

या विशेष रेल्वे गाडीचे नगर रल्वे स्थाकावर स्वागत करण्यात आले असून पार्सल डब्याची पूजा करून स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर व मुख्य वाणिज्य निरिक्षक रामेश्वर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गाडीत शेतकऱ्यांची उत्पादने भरण्यात आली.

जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी वर्गाला आता मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात आपला माल पाठवता येणार आहे. कोल्हापूर ते मनमाड जाणारी गाडी 25 सप्टेंबर पर्यत धावणार असून मनमाड ते कोल्हापूर जाणारी गाडी 27 सप्टेंबर पर्यंत धावणार असल्याने.

नगर जिल्ह्यातील जास्तीतजास्त छोट्या मोठ्या शेतकरी व व्यापारी वर्गानी या विशेष पार्सल रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर 95004913 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment