गटारीचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  संगमनेर शहरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर शिवाजी नगर परिसरातील तसेच शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

शहरातील गटारी, नाले तुंबून गेल्याने या नाल्यांमधील पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. संगमनेर नगरपालिकेने पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहराच्या उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पावसाळी वाहिन्या, नाले तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर शिवाजीनगर परिसर,

स्टेडियमच्या परिसर, तसेच अनेक उपनगरांमधील अनेक घरांत आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. काही घरांमध्ये अक्षरशः गुडघ्याइतके पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नागरिकांच्या घरांमध्ये थेट गटारीचे पाणी शिरले असल्याने घरांबरोबरच आजूबाजूच्या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती.

याशिवाय अनेक चौकादरम्यानच्या रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे या बाजूच्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment