अनोखे लग्न! वधू-वरांनी लग्नात घेतला आठवा फेरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  इतरांपेक्षा काहीतरी हटके स्टाईल करत लग्न करणाऱ्यांची उदाहरणे तुम्ही तर नक्कीच ऐकली असतील. मात्र, नगर जिल्ह्यातील पाच वधू-वरांनी वेगळ्याच पद्धतीने लग्न केलं. त्यांनी लग्न करताना सात नव्हे तर आठ फेरे घेतले.

या वधू वरांनी आठ फेरे का घेतले याचं कारण जर तुम्ही ऐकलंत तर तुम्हालाही त्यांचे कौतुक वाटेल. विवाह सोहळ्यात वधू-वरांनी “आठवा फेरा स्री-जन्माच्या स्वागताचा’ घेतल्याची माहिती स्री-जन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.

संगमनेर येथील दत्ता कासार, पारनेर येथील गोरखनाथ शिंदे व श्रीगोंदे येथील नवनाथ वाघमारे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला. चित्त परिवारातील डॉ. पूजा आणि चव्हाण परिवारातील हिमांशू, तसेच रुकारी परिवारातील सचिन व कोटकर परिवारातील सोनाली यांचा विवाह संगमनेर येथे झाला.

वाघमारे परिवारातील भारत व शिरवाळे कुटुंबातील नीता यांचा विवाह श्रीगोंदे येथे झाले. शिंदे परिवारातील अवधूत व जाधव परिवारातील मोनाली आणि शिंदे परिवारातील गायत्री, तसेच रणदिवे परिवारातील सूरज यांचा विवाह सुपे येथे झाला.

या पाचही विवाह सोहळ्यात आठवा फेरा स्त्री-जन्माच्या स्वागताचा घेण्यात आला. बेटी बचाओ चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी वऱ्हाडींना शुभेच्छा दिल्या.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment