शरद पवारांचा मोदी सरकारला सुरक्षेबाबत मोठा इशारा; म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणतेही संकट असो सदैव कर्तव्य तत्पर असतात. नैसर्गिक आपत्ती, कोरोना या काळातही त्यांनी व्यापक दौरे करून जनसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला. 

आता त्यांनी मुंबईत चीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित करून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत करत असल्याचा  इशारा दिला तसेच ङ्कखीही काही सल्ले दिले.

माजी परराष्ट्र सचिव आणि चीन विषयीचे तज्ज्ञ समजले जाणारे विजय गोखले आणि हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांना पवारांनी आपल्या निवासस्थानी चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं.

चीन विषयाचे तज्ज्ञ असल्याने गोखले यांनी आपले अनुभव सांगत सध्याच्या परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं. तर भूषण गोखले यांनी संरक्षणाची बाजू सांगितली.

दक्षिण चीन समुद्रात वाढत असलेलं चीनचं वर्चस्व हे गंभीर आहे. त्याच बरोबर श्रीलंका आणि नेपाळच्या धोरणांवरही अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत करत आहे असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, अमेरिकेच्या पेंटागॉनने  एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात दिलेली माहिती धक्कादायक आहे.

भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारताला घेरण्यासाठी आणि जगभर दबदबा निर्माण करण्यासाठी चीन भारता सभोवतालच्या 12 देशांमध्ये तळ उभारत असल्याची माहिती उघड झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment