वादळी पावसाने आता केलय उसाचे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. या पावसाने मुठेवाडगाव, माळवाडगाव शिवारातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे.

साखर कारखाने सुरू होण्यास दोन महिने अवधी असून त्यानंतर लागवड तारखेप्रमाणे नंबर येण्यास किती महिन्यांचा अवधी जाणार हे सांगता येत नाही. पडलेली ऊस पिके पुन्हा उभी राहणे शक्य नाही. ऊस पिकाचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. पावसासोबतच जोरदार वाराही सुरू झाला.

सुमारे अर्धा तास पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, अर्ध्या तासातच चोहीकडे पाणीच पाणी झाले. मात्र पावसासोबतच वार्‍याचाही जोर इतका होता की या वादळी पावसामुळे वाढलेले ऊस, मका, कडवळ, सोयाबीन ही पिके भुईसपाट झाली. सकाळी सकाळी शेतकर्‍यांनी शेतात फेरी मारली असता

पिके भुईसपाट झाल्याचे चित्र त्यांना पहावयास मिळाले व दुःखी अंत:करणाने फोन खणखणू लागला. नुकसान झाल्याने पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होऊ लागली. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली.

मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले.

परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment