महावितरणचा शेतकऱ्याला शॉक; डोळ्यादेखत झाले भासमसत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या काळात महावितरणच्या वाढीव वीजबिलाने नागरिक आधीच त्रस्त झालेले आहे. मात्र याच महावितरणाच्या चुकीमुळे राहुरी येथील शेतकऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

राहुरीमधील येवले आखाडा येथील शेतकरी सुरेश जगन्नाथ जाधव (रा. येवले आखाडा) यांच्या दोन एकर आडसाली ऊसाच्या प्लॉटला अचानक आग लागली.

आगीची बातमी समजताच राहुरी पालिकेच्या अग्निशामक विभागाला कळवले, घटनास्थळी बंब पोहचले देखील मात्र रस्त्यापासून आगीचे ठिकाण लांब असल्याने उपयोग झाला नाही.

आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याने परिसरातील पन्नास-साठ तरुणांनी जीव धोक्यात घालून उसात शिरले. आगीच्या पुढील बाजूचा ऊस मोडून, आग पसरणार नाही. यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.

दीड तास प्रयत्न करून, आगीवर नियंत्रण मिळविले. व आसपास असणारा ऊसप्लॉट वाचला. ऊस मालकांनी महावितरणच्या वीजवाहिनी येथील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले.

तर; महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी आगीचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले. त्यात, शेतकऱ्याचे एक लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले.

उसाच्या प्लॉट वरून महावितरणची ३३ केव्ही व ११ केव्ही क्षमतेची उच्चदाब वीज वाहिनी गेलेली आहे. खालची वीज वाहिनी उसाच्या शेंड्याला टेकत असल्याने, ऊस पेटल्याचे आदेश जाधव यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment