वांबोरी चारीला आजपासून पाणी सोडणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा धरणामधून पाणी ओव्हरफ्लो झाले आहे. पाणलोटामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने हे धरण पूर्णक्षमतेने भरले आहे.

मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी वांबोरी पाइपलाइन योजनेला सोडण्याची मागणी या शेतकऱ्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती.

त्यानुसार पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातील १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीसाठी शनिवारी ५ सप्टेंबर पासून पहिली मोटार सुरू करून पाणी पुरवठा सुरू करणार

असल्याचा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाथर्डी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना दिला. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पाइपलाइन बिघाड अथवा कोणकोणते तलाव कोरडे आहेत

याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी तनपुरे यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह या संपूर्ण भागात शुक्रवारी पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे ,

कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,

शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांच्यासह लाभधारक शेतकरी उपस्थित होते. यावेळी तनपुरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या वांबोरीच्या चारीच्या पाण्याविषयी समस्या जाणून घेतल्या.

काही तांत्रिक अडचणी निर्माण न झाल्यास उद्यापासून मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी पाणी सोडू, असा विश्वास तनपुरे यांनी यावेळी दिला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment