सलाम बळीराजाच्या जिद्दीला ! वादळाने झोपला ऊस अन ‘ह्या’ पट्ठ्याने केले ‘असे’ काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व परिसरात जोरदार हजेरी लावली. या पावसाने मुठेवाडगाव, माळवाडगाव शिवारातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे.

पडलेली ऊस पिके पुन्हा उभी राहणे शक्य नाही. परंतु तालुक्यातील माळवाडगांव येथील शेतकऱ्याने अफाट मेहनत घेऊन एक हेक्टर झोपलेला ऊस ऊठवून नायलॉन दोरीने मोळ्या बांधून उभा केला आहे.

सोन्याबापू पाटीलबा चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी कुटुंबातील सदस्याच्या मदतीने पाच दिवसात चक्क एक हेक्टर झोपलेला ऊस ऊठवून उभा केला.

अवजड असलेल्या ऊसास उभे करणे शक्य नाही. पुन्हा पडला तर हे सर्व माहीती असुनही म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे असेही नुकसान होणार आहे.

मग उभे करण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे. सोन्याबापू चव्हाण यांनी कुटुंबातील पत्नी दोन मुले सुन यांच्या मदतीने पाच दिवसांत गट नं.2 मधील एक हेक्टर (2.5 एकर ) ऊस नायलॉन दोरीने भोळ्या बांधून उभा केला.

चव्हाण यांनीअगोदर स्वतः पुढे होत .साप ,विंचू ,मधमाशी यांची काळजी घेत हे उद्दिष्ट पुर्ण केलें. अजून ऊस तोडणीस ५ महिन्याचा कालावधी जाणार असल्याने पडलेल्या ऊसाचे खुपचं वजन घटून नुकसान झाले असते त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याने त्यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment