कोरोनाच्या काळात भाजपकडून घाणेरडे राजकारण सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राज्यातील सध्याचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेले जात आहे. करोनाचे संकट सुरू असताना भाजपकडून खालच्या पातळीचे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप पारनेर तालुका शिवसेनेने केला आहे.

कंगना आणि तिच्या आईकडून सोशल मीडियातून अतिशय खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याचा निषेध करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

कंगनाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. कंगनाविरुदध मंबई महापालिकेने केलेल्या कारवाईचे समर्थन करताना पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके म्हणाले कि,

पहाटे शपथविधी होऊ शकतो, रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे कापली जाऊ शकतात तर मग मुंबई महापालिकेने आधी नोटीस देऊन अवैध बांधकाम पाडले तर त्यात गैर काय, असा टोला पारनेर तालुका शिवसेनेने केला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment