अहमदनगर ब्रेकिंग! त्याचे संशयाचे खूळ तिच्या जीवावर उठले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- सात फेरे घेत साताजन्माची साथ देण्याची त्यांनी शपथ घेतली, मात्र केवळ संशयाची सुई त्यांच्या आयुष्यात अशी टोचली कि तिला आपला जीव गमवावा लागला.

पत्नीचे पुण्यातील कोणाशीतरी सूत जुळले असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या पतीचा निर्घृण खून केला असल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे घटना घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, वर्षा आणि कृष्णा यांचे 4 वर्षांपूर्वीच लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ वाद सुरु झाले. साथ जन्माची साथ देण्याची शपथ घेतली मात्र संशयामुळे नात्याला तडा गेला.

दररोज होणारे वाद सोडविण्यासाठी दोन्ही कुटुंब प्रयत्न करू लागले. मात्र संशयाचे खूळ डोक्यात बसलेला कृष्णा सतत तिला शारिरीक व मानसिक त्रास देऊ लागला. तुझे पुण्यात काहीतरी चालू आहे.

असे म्हणत त्याने वर्षाला विचारणा केली. मात्र, असे काही नाही म्हणत या पलिकडे काही उत्तर आले नाही. दरम्यान, कृष्णा याने आपल्या पत्नीच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारुन तिला जखमी केले होते.

त्यानंतर तिला जास्त मार लागल्याने तिला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेत पहिल्यांदा आकस्मात मृत्युची नोंद केली होती.

मात्र, कालांतरांने तपासाअंती तो अकस्मात मृत्यू नसून ती हत्या असल्याचे समोर आला आहे. याप्रकरणी मयत मुलीचे पालक महेश जगन्नाथ ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षा कृष्णा जाधव (वय 23, रा. टाकळीभान) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. तर यात कृष्णा विठ्ठल जाधव (वय 31) यास आरोपी करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment