नाशवंत दूध विद्यार्थ्यांना पाजले; या ठिकाणचा धक्कादायक प्रकार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अनेकदा कालबाह्य झालेले अन्न खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे.

राजूर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या 22 आश्रम शाळेतील तब्बल 4 हजार 500 विद्यार्थ्यांना मुदत संपून कालबाह्य झालेले खराब सुगंधी दूध घाईगडबडीत वाट्ल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

याप्रकरणाची दखल संबंधित विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय करणार्‍या अधिकारी, ठेकेदार, मुख्याध्यापक यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर अंतर्गत 22 आश्रमशाळा असून 4 हजार 500 विद्यार्थ्यांना मुदत संपण्यास एक दिवस बाकी असताना

खराब सुगंधी दूध ठेकेदाराने आपल्या गाड्यांमधून आणून प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी हाताशी धरून त्यांच्या मार्फत वाटले.

याबाबत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्याशी संपर्क साधून या घटनेकडे गांभीर्याने पाहण्यासाठी लक्ष वेधले आहे.

अधिकार्‍यांशी संगनमत करून मुख्याध्यापक व कर्मचारी यांच्या माध्यमातून दुधाची मुदत संपण्यास तीन दिवस बाकी असतानाच ते वितरित करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून यास जबाबदार असणार्‍या ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कडक व फौजदारी कारवाई करावी,

अशी मागणी मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पिचड यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment