समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान , थोरात यांची सहा एकर शेती उद्ध्वस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील पावसामुळे कोकमठाण परिसरातील समृध्दी महामार्गावरील मातीचा भराव शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका, ऊस व कांद्याच्या शेतात वाहून आल्यामुळे मोठे नुकसान झाले.

भराव दाबण्यासाठी शेतकऱ्यांनी गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. कंपनीला जबाबदार धरुन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी,

अशी मागणी शेतकरी थोरात यांनी केली आहे.थोरात यांची सहा एकर शेती उद्ध्वस्त झाली. कांदा रोप सडून गेले. चार एकर सोयाबीन उपळली.

भुईमूग पीक जमीनदोस्त झाले. संजय थोरात, एकनाथ थोरात, विजय दाभाडे, संदीप भास्कर दाभाडे यांची सोयाबीन, मका, बाजरी आदी पिके वाया गेली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment