रानडुकरांसाठी सोडला जाणारा करंट शेतकऱ्यांच्या उठला जीवावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील काही गावात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचा त्रास वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून रानडुक्कर शेतात येऊ नये म्हणून शेताच्या बांधावर तारा बांधून त्या तारांमध्ये रात्रीच्या वेळी विजेचा करंट सोडला जातो.

मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बांधावर लावलेल्या तारांमध्ये करंट असल्याचे माहिती नसते. रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले शेतकरी या तारांना चिटकून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.

रानडूकर शेतात येऊ नये म्हणून विविध प्रकारचे उपाय करून शेताच्या बांधावर तारा बांधून त्यात रात्री करंट सोडला जातो. रानडुकर शेतात प्रवेश करताच

त्याचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो. मात्र शॉक लागून शेजारचा शेतकरी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. घाटशिरस येथे शॉक लागून मृत्युमुखी पडणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment